मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी (2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
ग्रामपंचायत निरगुडे (ह) ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत २ जानेवारी १९५८ रोजी स्थापन झाली असून तिच्या अखत्यारीत निरगुडे (ह) आणि बेलपाली ही दोन महसुली गावे येतात. तसेच, या ग्रामपंचायतीत जांभूळपाडा, चिंचपाडा आणि करवळपाडा या वाड्या-पाड्यांचा समावेश आहे.
गावाची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १४५५ आहे, त्यापैकी १००% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. या लोकसंख्येमध्ये पुरुष – ७२१ आणि स्त्रिया – ७३४ इतका समावेश आहे. गावाची एकूण भू-भाग १७६६.१६ हेक्टर असून त्यापैकी ९०१.९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तसेच वनक्षेत्र – ७६०.४५ हेक्टर व गावठाण क्षेत्र – ७.२९ हेक्टर आहे.
गावात २ जि.प. शाळा, ३ अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ हातपंप, २ विहिरी, ७ पाण्याच्या टाक्या, २ समाजमंदिर, २ स्मशानभूमी, १ सार्वजनिक शौचालय, २ सभामंडप, आणि १ ग्रामपंचायत कार्यालय आहे. तसेच, गावातील वीजसुविधेसाठी ७३ विजेचे पोल आणि ०४ हायमास्ट लाईट्स कार्यरत आहेत.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन व लघुउद्योग असून पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत म्हणजे विहिरी, नळयोजना व मिनी वॉटर सप्लाय यंत्रणा आहेत. गणेशोत्सव, पोळा, होळी, दिवाळी हे गावातील प्रमुख सण असून, गावाजवळील मंदिरे आणि निसर्गसंपन्न परिसर पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. गावात स्वच्छता, पर्यावरण रक्षण, जलसंधारण, आरोग्य सेवा आणि शिक्षणावर विशेष भर दिला जातो.